Type Here to Get Search Results !

fadnavis criticizes sharad pawar: देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर मोठा आरोप; म्हणाले..

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) यांच्या भेटीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत टीकास्त्र सोडलं आहे. ममता बॅनर्जी यांचा कालचा दौरा उद्योजकांना आकृष्ट करण्यासाठीचा नसून तो केवळ बहाणा होता, त्यांचा खरा अजेंडा हा राजकीयच होता. काँग्रेसला बाजूला ठेवून देशात आघाडी स्थापन करण्याचा ममतांचा प्रयत्न असून त्याला शरद पवार यांची साथ आहे, असा थेट आरोप फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. (opposition leader criticizes ncp chief over meeting with mamata banerjee) सर्वच विरोधकांना हे समजून चुकलेले आहे की येणारे २०२४ हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच असणार आहे. म्हणूनच त्यांना हरण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. २०१९ च्या निवडणुकीतही असेच प्रयोग झाले. मात्र लोकांनी मोदी यांच्यावरच विश्वास ठेवला. आताही जनता मोदी यांच्यावरच विश्वास ठेवणार आहे. क्लिक करा आणि वाचा- शरद पवार अंडरनाइन्ड स्टेटमेंट करतात- फडणवीस भाजप विरोधी आघाडी तयार करत असताना ममता बॅनर्जी यांचा काँग्रेस पक्षाला पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना शरद पवार यांची पूर्णपणे साथ असल्याचा मोठा आरोप फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. आता काँग्रेसला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. ते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे आता तुमचा आधी अंतर्गत सामना काय होतोय ते पाहतील आणि त्यानंतर ते आमच्याशी कसं लढायचं हे ठरवतीला असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. क्लिक करा आणि वाचा- ममता बॅनर्जी या थेट बोलतात आणि शरद पवार यांची बिटविन द लाइन बोलण्याची पद्धत आहे. ममता म्हणाल्या की देशात यूपीए अस्तित्वात नाही, ज्यांना लढायचंच नाही त्यांना आम्ही काय करणार आणि शरद पवार म्हणाले की जे कोणी भाजप विरोधात लढायला तयार आहेत असा सर्वांनाच घेऊन आम्ही आघाडी स्थापन करू. ममतादीदी आणि शरद पवार या दोघांचे बोलणे एकच आहे, असे फडणवीस म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसला राज्यात सोबत घेण्यावाचून पर्याय नाही- फडणवीस ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला कितीही डावलण्याचा प्रयत्न केला, तरी देखील महाराष्ट्रात काँग्रेसला सोबत घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याचेही फडणवीस म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dfc3QO

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.