Type Here to Get Search Results !

गारठ्याचा फटका! नगर जिल्ह्यात मेंढपाळांवर कोसळले 'हे' मोठे संकट

अहमदनगर: जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच्या गारठ्याचा फटका पिकांसोबतच पुशधनालाही बसत आहे. तालुक्यात गेल्या २४ तासांत शेकडो मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील मेंढपाळ अडचणीत आले आहेत. प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून अद्याप मृत्यूची नेमकी आकडेवारी मिळालेली नाही. तालुक्यातही २६ मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यात मोठ्या संख्येने मेंढीपालन व्यवसाय केला जातो. मेंढ्यांना छत नसलेल्या बंदिस्त जागी ठेवण्याची पद्धत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सोबतच गारठा आहे. त्याचा फटका मेंढ्यांना बसला. पाऊस आणि गारठा सहन झालेल्या मेंढ्यांचा ठिकठिकाणी मृत्यू झाला. अद्याप याची नेमकी आकडेवारी हाती आली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाचशेच्या आसपास मेंढ्या दगावल्याचे मेंढपाळांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील रांधे, पाडळी आळे, पळवे, पोखरी, वारणवाडी, पठारवाडी, कुरुंद, म्हसोबाझाप, खडकवाडी, वनकुटे, चोंभूत, शिरापूर, कातळवेढा, तिरकळ मळा, पुणेवाडी, पुणेवाडी फाटा, सोबलेवाडी, किन्ही, कान्हूर पठार, कळमकरवाडी, पाडळी रांजणगाव, निघोज या पारनेर तालुक्यातील तसेच पिंपरी विळद, मावळेवाडी या नगर तालुक्यातील गावांना फटका बसला आहे. वाचा: आमदार निलेश लंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शासकीय मदतीची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक गावांत कुठे वीस, कुठे तीस तर कुठे पन्नासवर मेंढ्या अतिवृष्टीने मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. पारनेरचे तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी सुरू केली आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मेंढपाळांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी मेंढपाळ संघटनेने केली आहे. संगमनेरमध्ये २६ मेंढ्या दगावल्या! संगमनेर तालुक्यातील साकुरसह इतरही भागातील हे मेंढपाळ कुटुंब पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. पुन्हा गावाकडे परतत असताना ते नांदूर खंदरमाळ परिसरात मुक्कामी थांबले होते. पावसामुळे पडलेल्या प्रचंड गारठ्याचा फटका या सात मेंढपाळ कुटुंबांना बसला असून काल मध्यरात्री कडाक्याच्या थंडीने त्यांच्या २६ हून अधिक मेंढ्या थंडीने मरण पावल्या आहेत. मेंढपाळांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती समजताच तलाठी युवराजसिंग जारवाल, गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. उस तोडणी मजुरांचेही हाल जिल्ह्यात साखर कारखाने सुरू असून ठिकठिकाणी ऊस तोडणी कामगार शेतातच वस्ती करून राहत आहेत. पावसामुळे त्यांचेही हाल झाले आहेत. पावसामुळे तोडणीचे काम बंद पडले आहे. तर तात्पुरत्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मजुरांचे हाल होत आहेत. पक्का निवारा नसल्याने गारठ्याचाही त्यांना त्रास होत आहे. काही ठिकाणी गावकऱ्यांनी त्यांना आश्रय दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pn5Htp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.