जळगाव: '' () या व्हेरिएंटची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप आपल्या देशात आढळलेला नसल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र, त्याला अटकाव घालण्यासाठी सुरक्षितता बाळगणं तितकंच गरजेचं आहे. प्रत्येकानं करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर ही खबरदारीची त्रिसूत्री पाळली तर करोनाच होणारच नाही, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी व्यक्त केला आहे. राज्यात करोनाचा पहिला रुग्ण हा जळगाव जिल्ह्यात आढळून आला होेता. त्यानंतर करोनाची पहिली व दुसरी लाट आली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४२ हजार ७९७ कोरोनाबाधित आढळून आले. तर आजपावेतो कोरोनामुळे २ हजार ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. सद्यस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव मंदावला असला तरी इतर काही देशांमध्ये करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरीएंट आढळला आहे. त्यामुळं जळगाव जिल्हावासीयांनी ओमायक्रॉनची धास्ती घेतली आहे. वाचा: या पार्श्वभूमीवर डॉ. किशोर इंगोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'इतर देशांतील परिस्थितीचा आढावा घेतला असता तिथं ओमायक्रॉनची सर्वाधिक लागण तरुणांमध्येच झाल्याचं दिसून येत आहे. थोडा थकवा आणि डोकेदुखी एवढीच लक्षणे दिसून आलेली आहेत. सध्यातरी नव्या व्हेरिएंटमुळे इतर देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. आपल्या देशात हा व्हेरिएंट आलेलाच नाही. मात्र खबरदारी आवश्यक असून करोनाचे दोन्ही डोस घ्यावेत आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग व मास्क ही खबरदारीची त्रिसूत्री पाळली तर ओमायक्रॉनच काय, करोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आला तर त्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो, असेही डॉ. किशोर इंगोले म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xInwXS