जालनाः ओमायक्रॉनचा (omicron) धोका लक्षात घेता इतर देशांमधून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांसंबंधी केंद्र सरकारची प्रमाणित नियमावली लागू करावी, असे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विदेशांतून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून स्वतंत्र नियमावली लागू केली होती. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे करण्यास मनाई केली आहे. त्यामुळं राज्य सरकार लवकरच हा आदेश मागे घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री () यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून लागू केलेल्या नियमावलीत इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, देशातंर्गंत विमान प्रवास करताना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नको, असे केंद्र सरकारचे आदेश आहेत. राज्य सरकारने घेतलाला हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकारने केली होती. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास यांना पत्राद्वारे ही सूचना केली. त्यानंतर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. वाचाः केंद्र सरकारकडून राज्य सरकारने काढलेला आदेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली असून आजच हा आदेश मागे घेतला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. धोकादायक ११ देशातून आलेल्या विमान प्रवाशांसाठी लगेचच RTPCR चाचणी बंधनकारक असून ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांनतर ७ दिवस होम कवारंटाईन बंधनकारक असून आठव्या दिवशी पुन्हा RTPCR बंधनकारक आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. धोकादायक असलेले ११ देश वगळून इतर देशातून आलेल्या प्रवाशांसाठी हा नियम नसून फक्त RTPCR चाचणी केली जाणार आहे, असं सांगताना आरोग्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आदेशात वेगळेपण राहणार नाही, असंही स्पष्ट केलं. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xIKeiA