Type Here to Get Search Results !

tatkare vs jadhav: तटकरे माझ्या अंगावर कधी येतात हेच पाहत होतो; भास्कर जाधव यांचे आव्हान

चिपळूण: रायगड लोकसभेचे खासदार (Sunil Tatkare) हे नाव राष्ट्रवादीचे घेतात, मात्र काम सगळे कुटुंबवादाचेच करतात. यांना फक्त घ्यायचं कळतं. देण्याचं कळत नाही. आमदारकी, खासदारकी,नगराध्यक्षपद, ही सगळी पदं त्यांना घरातच हवीत. मुलगा, मुलगी, भाऊ, वाहिनी, व्याही यानांच सगळी पदं सुनील तटकरे यांनी वाटली, अशी घणाघाती टीका गुहागरचे आमदार (Bhaskar Jadhav) यानी मंगळवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत केली आहे. यामुळे आता या दोन्ही नेत्यांमधील वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली दौऱ्यावेळी खासदार तटकरे यांनी आमदार जाधव यांच्यावर टिका केली होती. याला आमदार जाधव यानी नेहमीच्या शैलीत आरोप करत प्रत्युत्तर दिले. या वेळी बोलताना तटकरे माझ्या अंगावर कधी येतात याचीच आपण वाट पाहत होतो, असं सांगत भास्कर जाधव यांनी तटकरे यांना एक प्रकारे आव्हानच दिलं आहे. (mla criticizes mp ) ...तर मिर्ची तटकरे यांना का झोंबली? 'कुणबी समाजाला विद्यार्थी वसतिगृहासाठी आणखी पैसे मुख्यमंत्र्यांकडून आणुन देईन, असं मी म्हणालो व त्यांना विधानपरिषद उमेदवारी दया' अस मी म्हणालो. यात अपमान नाही तर कुणबी सामाजाचा सन्मान होईल, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. कुणबी समाजासाठी मी विधानपरिषद उमेदवारी दया, असे म्हटले. तर, खासदार सुनील तटकरे याना मिर्ची का झोंबली? असा सवालच जाधव त्यांनी उपस्थित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- 'त्या' कित्येक नेत्यांची राजकीय माती यांनीच केली दिवंगत माणिकराव जगताप काय म्हणाले, याची आठवण आहे. ती क्लीप आहे ती व्हायरल करावी लागेल. माणिकराव जगताप यांची राजकारणात माती तटकरे यांनीच केली. भुजबळ विरोधी पक्षनेते होते तेव्हा सुनील तटकरे यांना चिपळूणचे माजी आमदार नानासाहेब जोशी घेऊन गेले. त्यावेळी नानांनी माणिक जगताप यांना सांगितले की हा तुला नवीन सहकारी घे. पण याच तटकरे यांनी जगताप यांच्या राजकारणाची माती केली, अशी बोचरी टीका आमदार जाधव यांनी केली. रायगडमधील आमदार जयंत पाटील, रवीशेठ पाटील अशा कित्येक नेत्यांचे राजकीय नुकसान करण्याचं काम तटकरे यांनी केले आहे, असाही घणाघाती आरोप जाधव यांनी केला आहे. मला पक्षाने मोकळे सोडल्यास मी थेट रायगडात जाऊन या सगळयाचा समाचार घेणार आहे, असेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'नैतिकतेच्या गोष्टी तटकरे यांनी करू नयेत' कित्येक कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असलेल्या तटकरे यांचे मार्ग जेलच्या दिशेने जातात, त्यामुळे त्यांचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही सामान्य आहोत. यांना मी काय मार्गदर्शन करणार? ज्यांचे आचार-विचार स्वच्छ असतात त्यांना मार्गदर्शन करता येईल, नैतिकतेच्या व नीतीमत्तेच्या गोष्टी तटकरे यांनी करू नयेत. गरिबांच्या जिमिनी हडप करून खोट्या यांनी कंपन्या काढल्यात, असा भ्रष्टाचाराचा थेट आरोपच आमदार जाधव यानी केला. मला म्हणतात की मी पक्ष बदलून आलो. तर ते मी जाहीरपणे मान्य करतो. पण तुम्हीही काँग्रेसमधून आलात हे विसरू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Eons28

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.