मुंबई: भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या प्रकरणांत ईडीने काय कारवाई केली आहे, याची विचारणा करण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ कार्यालयात जाणार आहे. याबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( ) वाचा: काही नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणांची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली आहे. ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीकडे देणार आहेत, असे मलिक यांनी नमूद केले. लवकरच ईडी कार्यालयात जाऊन नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत, याची विचारणा आम्ही करणार आहोत व त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. वाचा: ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतिमान करा, असे आवाहनही ईडी अधिकाऱ्यांना केले जाणार आहे, असे मलिक म्हणाले. सत्तेचा गैरवापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांवर कारवाई केली जातेय. मात्र भाजपमधील लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल होऊनही कारवाई होत नाही. याचा जाब आमचे शिष्टमंडळ विचारणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. वक्फ बोर्डात पारदर्शकता आणण्यासाठी... पुण्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत तर वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या एका ट्रस्टशी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाली आहे, असे नमूद करताना वक्फ बोर्डाचा कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचा दावा मलिक यांनी केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून वक्फ बोर्डाने क्लीनअप कार्यक्रम हाती घेतला आहे. आजवर बोर्डाकडून सात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेनंतर बोर्डावर दहा लोकांच्या नेमणूका करण्यात आल्या. वक्फ बोर्डाला कधीही पर्मनंट डायरेक्टर मिळालेला नाही. दोन वर्षांसाठी सीईओ अधिकारी नेमण्यात आला आहे. पारदर्शकता आणण्यासाठी कामकाज डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे मलिक म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wzRMUl