मुंबई: महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या संस्थेशी संबंधित जमीन प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने पुण्यात सात ठिकाणी आज छापे टाकले. यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर अल्पसंख्याक मंत्री यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले असून वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापा पडलेला नाही, असे नमूद केले आहे. ( Nawab Malik On ) वाचा: अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. त्यामुळेच पुण्यातील समोर आल्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होत होती. त्याचा मलिक यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. वक्फ बोर्डावर ही कारवाई झालेली नसून वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या एका ट्रस्टशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आलेले आहेत. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीत, असे मलिक यांनी स्पष्ट केले. वाचा: सुरू आहे. बोर्डातील सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे, असे नमूद करतानाच वक्फ बोर्डाकडे ३० हजार संस्थांची नोंद असून त्याची चौकशी करायची असल्यास ईडीने ती करावी, असेही मलिक यांनी सांगितले. ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहचले असे सांगितले जात आहे पण मी ईडीला घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही मलिक म्हणाले. पुण्यातील कारवाईबाबत मलिक म्हणाले... मलिक यांनी पुण्यातील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. ही कारवाई ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टशी संबंधित प्रकरणात झाली आहे. इम्तियाज हुसेन शेख आणि इतर ट्रस्टींनी बनावट दस्तावेजाच्या आधारे पैसे हडप केले असून याबाबत वक्फ बोर्डाच्या तक्रारीवरून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी चांद रमजान मुलानी, इम्तियाज मोहम्मद हुसेन शेख, कलिम सय्यद व अन्य दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात ईडीने आज छापेमारी केली आहे, असा दावा मलिक यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3on5HsY