Type Here to Get Search Results !

भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; 'जमावबंदी लागू करून...'

अहमदनगर : ‘सध्या राज्यातील जनतेचे विविध प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, राज्यातील सरकारला हे प्रश्न सोडविता येत नाहीत. त्यामुळे लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करून दबाव आणला जात आहे,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांनी केला. ( ) वाचा: भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ करोना आणि नैसर्गिक आपत्‍तीमुळे राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. तीन पक्षांच्‍या सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यात कोणतेही स्‍वारस्‍य राहिलेले नाही. जनतेचा उद्रेक रस्‍त्‍यावर येवू नये म्‍हणून सरकार फक्‍त जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्‍न सोडविण्यापेक्षा लागू केले जात आहेत. एसटी कामगार संघर्ष करीत आहेत. आता विजेच्या प्रश्नासाठी गावोगावी रस्त्यावर उतरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने राज्यातील जनतेला कोणतीही मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा सरकारने पाठविल्या आहेत. एसटी कामगार आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात बसून आहेत. सरकारच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या फक्त बैठका सुरू आहेत. कामगारांना न्याय देण्याची इच्छाशक्ती महाविकास आघाडी सरकारमध्ये दिसून येत नाही,’ असा आरोपही त्यांनी केला. वाचा: ‘राज्यात गावोगावी असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. पण महाविकास आघाडी सरकारने मंत्री यांना पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कोणी गांजा ओढला की ड्रग्ज घेतले याच्याशी राज्यातील जनतेला काही देणेघेणे नाही. राज्‍यातील नागरिकांना त्‍यांच्‍या दैनंदिन गरजा महत्त्वाच्‍या आहेत. मूळ प्रश्‍नापासून लक्ष विचलित करण्‍यासाठीच महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाला अधिक महत्त्व देत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात ११० कोटी करोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा देण्याचा विश्वविक्रम केला आहे. ८० कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले. पेट्रोल-डिझेलवरील कर माफ करून जनतेला दिलासा दिला. मात्र, राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. दारूवरचे कर कमी करण्यात महाविकास आघाडी सरकारला अधिक धन्यता वाटत आहे.' वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nK0ufH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.