Type Here to Get Search Results !

हॉटेल चालकाने कांदा दिला नाही म्हणून सुरू झालेला वाद इतका पेटला की...

मोहसिन शेख । औरंगाबाद शहरातील तरुण- तरुणींचा सर्वाधिक वावर असलेल्या कॅनॉट प्लेस परिसरात रात्री दोन गटांत शुल्लक कारणावरून तुफान हाणामारी झाली. परिणामी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. एका हॉटेलमध्ये कांद्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याने काही काळ लोकांची पळापळ पाहायला मिळाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. झाले असे की,औरंगाबाद शहरातील कॅनॉट भागात व्हीआयपी मराठा हॉटेलमध्ये काही जण जेवण करण्यासाठी आले असताना कांदा देण्यावरून किरकोळ वाद झाला. मात्र तिथे उपस्थित लोकांनी वाद मिटवला सुद्धा, पण याचवेळी हॉटेल बाहेर उभे असलेल्या एका घोळक्याने हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या लोकांशी वाद घालायला सुरुवात केली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारी सुरू असतानाच आणखी काही ३०-४० जण पुन्हा धावून आले. तर दुसरीकडे हॉटेलमधील लोक सुद्धा या राड्यात उतरले आणि दोन्ही गट हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर तुटून पडले. या हाणामारीत सात ते आठ जण जखमी झाले आहेत. तर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दाखल झाले. तसेच परिस्थिती पाहता दंगल नियंत्रण पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलं. काही वेळातच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. हाणामारी करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l8pewD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.