मुंबईः राज्यात (msrtc workers strike) आता अधिक तीव्र होत आहे. एसटी संपावर अद्यापही कोणता तोडगा निघाला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Sharad Pawar)आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड () यांनी एक ट्वीट केलं आहे. मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर देत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या ४० वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. वाचाः ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडे हे मंजूर करून घ्यायचे. मुंडे साहेबांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरद पवार यांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे. वाचाः नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. आणि जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे. आणि तेच काम शरद पवार करतील, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cEgOIz