: येथे लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे आमदार यांनी सायंकाळी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आगीच्या कारणांबद्दल माहिती दिली. ही आग तेथील व्हेंटिलेटरमधून भडकल्याचे आपल्याला कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. करोना काळात पीएम केअर फंडातून देण्यात आलेले येथे आहेत. त्याकडेच पवार यांनी बोट दाखविले आहे. मात्र, यासंबंधी चौकशी झाल्याशिवाय घाईघाईने कोणालाही दोष देता येणार नसल्याचेही पवार म्हणाले. यातून आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे. घटना घडल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत राज्य सरकारला यासाठी जबाबदार धरले आहे. तर आता आमदार पवार यांनी थेट केंद्र सरकारकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. ( ) वाचा: जिल्हा रुग्णालयातील करोना वॉर्डातील अतिदक्षता विभागाला सकाळी आग लागली. त्यामध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार रोहित पवार यांनीही भेट देऊन पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. वाचा: रोहित पवार म्हणाले, 'या रुग्णालयाने आणि येथील कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात चांगले काम केले आहे. रुग्णांना मदत करणारा येथील स्टाफ आहे. मात्र आज दुर्दैवी घटना घडली. आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार येथील व्हेंटिलेटरमधून आग भडकल्याचे सांगण्यात आले. हे व्हेंटिलेटर कोणी दिलेले आहेत, ते सदोष होते का, हे पहावे लागेल. मात्र, व्हेंटिलेटरलाच आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन बंद केला. त्यामुळे आधीच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. आग पसरत गेली आणि भीषण दुर्घटना घडली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी लागेल. या रुग्णालयाच्या आवारात बांधून तयार असलेली ही इमारत करोना काळात वापरण्यासाठी सुरुवात झाली. त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या झाल्या. काही गोष्टी राहून गेल्या असतील. येथील व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून मिळालेले आहेत. असे असेल तरी आम्ही कोणावर लगेच आरोप करीत नाही. जे काही सत्य आहे, ते चौकशीतून पुढे येईल. मात्र, आज आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले, हेही नाकारून चालणार नाही.' वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yq0pnM