Type Here to Get Search Results !

रामदास कदम यांना शिवसेनेनं उमेदवारी का नाकारली?; संजय राऊत म्हणाले...

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी शिवसेनेनं मुंबईतून माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे नेते व विद्यमान आमदार () यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार () यांनी ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. 'सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघात आमदार होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघ सोडला होता. त्यांचा हा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या त्यागाची आणि निष्ठेची आठवण ठेवून त्यांना उमेदवारी दिली आहे,' असं संजय राऊत म्हणाले. वाचा: शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोप आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील मध्यंतरी व्हायरल झाली होती. त्यामुळंच त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी थेट काही बोलण्यास नकार दिला. मात्र, रामदास कदम हे देखील कडवट शिवसैनिक असून पक्षाचे नेते आहेत. अनेक वर्षे ते पक्षाचं काम करत आहेत. ते आमदार होते, मंत्री होते, विधान परिषदेतही होते. ते माझे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करत राहू,' असं राऊत म्हणाले. रामदास कदम हे आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार का असं विचारलं असता, 'ते पक्षाचे नेते आहेत. बाळासाहेबांनी त्यांना नेते म्हणून नेमलं आहे. त्यामुळं नाराज होण्याचं कारण नाही,' असं राऊत यांनी सांगितलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HEFM8V

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.