Type Here to Get Search Results !

एसटी कामगारांना निलंबित करण्यात कसले भूषण?; 'या' नेत्याचा सवाल

अहमदनगर: ‘कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करण्‍यात महाविकास आघाडी सरकारला कसले भूषण वाटते?’ असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते () यांनी केला आहे. ‘सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा करून संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या ऐकून घेऊन तोडगा काढावा,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे. एसटी कामगारांच्या संपासंबंधी () विखे पाटील यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मागील पंधरा दिवस एसटी कामगार संपूर्ण राज्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. न्‍याय मिळत नसल्‍याने कामगारांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या घटना रोज घडू लागल्‍या आहेत. राज्यात आतापर्यंत ४० हून अधिक एसटी कामगारांचे मृत्यू झाले आहेत. दिवसागणिक ही संख्‍या वाढत चालली असतानाही संपाबाबत सरकार जर काहीच निर्णय करणार नसेल तर हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. सरकारला अजून किती कामगारांचे मृत्‍यु हवे आहेत? सरकारने कामगारांच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याबाबत फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता सकारात्‍मक भूमिका घेतली पाहिजे. कामगारांवर कारवाई करणे हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येऊन कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणून एसटीच्या सुविधेकडे पाहिले जाते. परंतु या कामगारांच्या प्रश्नाकडेच महाविकास आघाडी सरकारला पाहायला वेळ नसल्याची खंत वाटते. एसटी कामगारांच्या श्रमातून महामंडळाचा डोलारा उभा राहिला आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये. सरकारने कामगारांच्या प्रश्नाचा विषय जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचा केला आहे. कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करण्‍यात महाविकास आघाडी सरकारला कसले भूषण वाटते? कामगारांवर कारवाई करणे हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येऊन कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा. विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे,’ असेही विखे पाटील म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x7fmrD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.