Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील 'या' घटना चिंताजनक; फडणवीसांनी सरकारला केलं सावध

मुंबई: त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांचे पडसाद आज महाराष्ट्रात पाहायला मिळाले. राज्यातील अनेक शहरांत मोर्चे काढण्यात आले असून काही ठिकाणी या मोर्चांना हिंसक वळण लागले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. ( ) वाचा: 'त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज , आणि येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी', असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. वाचा: नेमकं काय आहे प्रकरण? समोर आल्या आहेत. तिथे गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. याबाबत सोशल मीडियातही काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यावर पोलिसांकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. असे असतानाच त्रिपुरातील घटनांचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांकडून देशातील अनेक भागांत बंद पाळण्यात येत आहे. महाराष्ट्रातही आज अमरावती, मालेगाव, नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. त्यात अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी अनेक दुकानांची तोडफोड केली असून पोलिसांनाही काही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहे. त्यातून तणावाची स्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थिती हाताळत आहेत. या मोर्चांकडे बोट दाखवतच फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30kh8cN

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.