Type Here to Get Search Results !

राज्यात पावासाचं जोरदार कमबॅक, रस्ता पाण्याखाली वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

अकोला : राज्यात दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अकोला जिल्ह्यातही कालपासून कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे अकोट-दर्यापूर मार्गावरील येवदा ते वडनेर गंगाई दरम्यान निर्माणाधीन पुलाजवळील कच्चा रस्ता पाण्याखाली वाहून गेला. त्यामुळे अकोट ते दर्यापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अजूनही काम पूर्ण झालं नाही. काही दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे तसेच निर्माणाधीन पुलाच्या संथ कामामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या कामामुळे अकोट दर्यापूर अमरावतीकडे जाणारी वाहतुक ही वारंवार ठप्प होत असून अजून संपूर्ण पावसाळा बाकी असल्याने या समस्येवर लवकर ठोस उपाय करण्यात यावा अशी जनतेची मागणी होत आहे. दरम्यान, शुक्रवारी कोकणात मुसळधार पाऊस होणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून राज्यभर पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dVVRKg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.