पुणे: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी राज्य सरकारनं नेमलेल्या आयोगाचं कामकाज लवकरच सुरू होणार असून जबाब नोंदवले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचाही या प्रकरणात जबाब नोंदवला जाणार आहे. चौकशी समितीचे वकील आशिष सातपुते यांनी एएनआयला ही माहिती दिली. त्यानुसार, येत्या २ ऑगस्टपासून चौकशी आयोग साक्षी नोंदवण्याचं काम सुरू करणार आहे. शरद पवार यांनाही जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. वाचा: १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांनी एकूण १६२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळं भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काही लोक अद्यापही तुरुंगात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं केली होती. मात्र, त्यानंतर हा आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगानं १८ मार्च २०२० रोजी शरद पवारांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं होतं. मात्र, करोना लॉकडाऊनमुळं नंतर आयोगाचं कामकाज ठप्प झालं होतं. ते आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपींपैकी ८४ वर्षीय स्टॅन स्वामी यांचा नुकताच मृत्यू झाला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vq0sy3