नगर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप असा वाद सतत पाहायला मिळतो आहे. अशात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना चांगलाच टोला लगावला आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते नगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना 'तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही तर तो शिवसैनिक आहे असं म्हटलं जातं' असंही संजय राऊत राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलोय वाघासारखचं मरणार असेही राऊत म्हणाले. इतकच नाहीतर नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एक नंबर जिल्हा झाला पाहिजे असं त्यांनी कार्यक्रमात म्हटलं. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, बऱ्याच खासदारांना कोणी ओळखत नाही पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखलं जातं. शिवसेना म्हणून त्यांची संसदेत ओळख असते. शिवसैनिक हीच त्यांची खरी ओळख कायम राहते. त्यामुळे नारायण राणे यांनी किती पक्ष बदलले तरी ते शिवसैनिकच राहणार असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j4avkA