ठाणेः () यांचे धाकटे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष () यांनी केंद्र सरकार व राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचे आवाहन केलं आहे. करोना आणि लॉकडाऊनमुळं अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी आंदोलन करा, असंही त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं आहे. मागण्या पूर्ण न होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, असं आंदोलन करा. तुम्ही असं केलं, तर उद्धव ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कोणी. आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा. त्यांना सांगा आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही, असं प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं आहे. करोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नियमभंग केल्याप्रकरणात हे गुन्हे दाखल केले असून यासंदर्भातील तक्रारीही व्यापाऱ्यांनी मोदी यांच्यासमोर मांडल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C9PYnt