Type Here to Get Search Results !

'चौकशी टाळण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडून कायद्याचा दुरुपयोग'

मुंबई: 'चौकशीतून सुटका होण्यासाठी यांनी कायद्याचा दुरुपयोग करत याचिका केली असून त्यांची याचिका हायकोर्टाने थेट फेटाळणे आवश्यक आहे', असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्यावतीने आज मुंबई हायकोर्टात करण्यात आला. ( ) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात राज्य सरकारने लावलेल्या दोन प्रशासकीय चौकशींच्या विरोधात परमबीर यांनी केलेल्या याचिकेवर आज न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील यांनी युक्तिवाद केला आणि परमबीर यांची याचिका फेटाळण्याची विनंती केली. 'मी तत्कालीन गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री यांना त्याविषयी पत्र लिहिले, म्हणून सूडबुद्धीने मला लक्ष्य केले जात आहे. माझ्याविरोधात एफआयआर केले जात आहेत, असा दावा परमबीर यांच्याकडून केला जात आहे. मात्र असा युक्तिवाद मांडून परमबीर हे त्यांच्याविरोधातील प्रत्येक तक्रारीतून सुटू पाहत आहेत. जणू काही त्यांना कोणताही कायदा लागूच होत नाही अशाप्रकारे सगळं काही सुरू आहे. मुळात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापूर्वीच पोलीस अधिकारी यांनी २ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करणारी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्याविषयीच्या चौकशीतून सुटका होण्यासाठीच परमबीर यांनी कायद्याचा दुरुपयोग करत ही याचिका केली असून ती हायकोर्टाने थेट फेटाळणे आवश्यक आहे', असे दरायस खंबाटा यांनी नमूद केले. चौकशीच्या प्रगतीबाबत कोर्टाने अतिरिक्त सरकारी वकील जयेश याज्ञिक यांना विचारणा केली असता दोन्ही प्रकरणात चौकशी अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर परमबीर यांचे वकील महेश जेठमलानी यांनी या चौकशीबाबत कोणताही समन्स अथवा नोटीस मिळालेली नाही, असा दावा केला. त्यानंतर परमबीर यांच्या याचिकेवरील आपला निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला आहे. ६ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दुसऱ्या प्रकरणात परमबीर सिंह आणि माजी राज्य गुप्तचर विभाग आयुक्त रश्मी शुक्ला या दोघांच्या याचिकांवरील सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. यावेळी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला या दोघांविरोधात अटकेची कारवाई होणार नसल्याची हमी राज्य सरकारने ६ ऑगस्टपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे दोघांनाही तूर्त दिलासा मिळाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f4Xczc

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.