जळगाव: 'आपल्या हाती सत्ता दिली तर ओबीसींना ४ महिन्यांत आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन', अशी घोषणा यांनी भाजपच्या चक्काजाम आंदोलनावेळी केली होती. मात्र, त्यांची वक्तव्य विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. यापूर्वीही त्यांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न कराणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली. परंतु, ती मोडून त्यांनी लग्न केले, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते यांनी फडणवीसांना घेतला आहे. जळगावात पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी ही टीका केली. ( ) वाचा: एकनाथ खडसे आज दुपारी जळगावात काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आलेले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. खडसेंनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने जनगणनेचा डाटा उपलब्ध करून दिला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकणार आहे. मात्र, एकीकडे केंद्राकडून हा डाटा मिळू द्यायचा नाही आणि दुसरीकडे आम्ही ओबीसींचे पाठीराखे आहोत असे म्हणायचे, ही भाजपाची दुटप्पी भूमिका आहे. ओबीसी आरक्षण हा काही आजचा विषय नाही. २०११ मध्ये त्यासंदर्भात प्रयत्न झाले होते. तेव्हा जनगणना झाली होती. त्याचा डाटा केंद्र सरकारकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २ वेळा हा डाटा उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिले. पंकजा मुंडे तसेच यांनीही याबाबत पत्र लिहिले आहे. परंतु, केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. ५ वर्षांच्या कालखंडात फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून ओबीसींना आरक्षण का दिले नाही? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. ती फसवणूकच होती. कारण जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही तोपर्यंत अध्यादेशाला अर्थ नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती असल्याचाही आरोप खडसे यांनी केला. वाचा: आपल्या हाती सत्ता दिली तर ओबीसींना ४ महिन्यांत आरक्षण देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. यावरूनही खडसे यांनी फडणवीसांना चिमटा घेतला. फडणवीस वारंवार अशी वक्तव्ये करतात. ती विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावेळीही, वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाहीत, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी ही भीष्मप्रतिज्ञा मोडून लग्न केले. फडणवीस यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असेही सांगितले होते. पण पहाटे त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत शपथ घेतल्याची आठवणही खडसे यांनी करुन दिली. फडणवीसांनी संन्यास घेऊ नये देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये. ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत. पाच वर्षे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत रहावे आणि सरकारला अशाच पद्धतीने सूचना देत रहावे, अशी विनंती आपण फडणवीस यांना करेन, असेही खडसे म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A3PM7X