Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात निर्बंध कडक होताच गोवा सरकारचा मोठा निर्णय, प्रवास करताना सावधान

सिंधुदूर्ग : करोना रुग्णसंख्येत होणारी वाढ, डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळं राज्य सरकारने अनलॉकबाबत सावध पावलं उचलली आहेत. त्यामुळं राज्यात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांना तसेच महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण देशातील तीन राज्यात आढळले आहेत. सर्वाधिक महाराष्ट्रात रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रा बरोबर लगतचे गोवा राज्य सतर्क झाले आहे. अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रशासन अलर्ट झाले असून महाराष्ट्रातून गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या चार सीमा बंद करण्यात आल्या आहेत. गोवा राज्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असून त्याची चाचणी नसेल त्याची चाचणी नाममात्र शुल्क लावून केली जात आहे. डेल्टा प्लस विषाणू व्हायरसचा गोवा राज्यात प्रादुर्भाव वाढू नये या करिता गोवा राज्य सतर्क झाले असून गोवा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून गोवा पत्रादेवी येथे तपासणी सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांनी प्रवास करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. अन्याथा तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. दरम्यान, राज्यात मॉल आणि थिएटर अद्याप बंद आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील. सायंकाळी 4 पर्यंत जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, हॉटेल्ससुद्धा 50 टक्के क्षमतेसह सुरू होतील. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवरही बंदी लागू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त 50 लोकांना विवाह सोहळ्यासाठी आणि जास्तीत जास्त 20 लोकांना अंत्यसंस्कारासाठी परवानगी आहे. स्टुडिओच्या बाहेर चित्रपटांचे चित्रीकरण केले जाणार नाही. मुंबई लोकल सामान्य प्रवाश्यांसाठी बंद राहील.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hh5nsn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.