म. टा. प्रतिनिधी । तालुक्यातील कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २० कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७ कोकरे जखमी झाली आहेत. कळपातील ४ कोकरे बिबट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कापरीसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाचा: रेड येथील मेंढपाळ सुभाष तांदळे यांची मेंढरे कापरी येथील श्रीकांत पाटील यांच्या शेतात बसवली होती. शेतात कुंपण त्यांनी त्यात ३१ कोकरे ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर ते जेवण आणण्यासाठी शेतातून गावाकडे गेले होते. याच वेळेत शेजारच्या ऊसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात २० कोकरांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ कोकरे जखमी झाली आहेत. बिबट्याने चार कोकरे लंपास केली आहेत. शेताचे मालक श्रीकांत पाटील शेतात पोहोचताच बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात कोकरे ठार झाल्याचं पाहताच मेंढपाळ सुभाष तांदळे यांना अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेत तांदळे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याने कोकरांवर हल्ला केल्याचे समजताच शिराळा येथील निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनरक्षक बाबा गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dBSc3A