Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा धोका किती?; आरोग्यमंत्री स्पष्टच बोलले

जालनाः दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा () फैलाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन पुन्हा एकदा सावध पावलं उचलत आहेत. दक्षिण आफ्रिकेतून राज्यात येणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काय पावलं उचलली आहेत याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे हे आज जालन्यात असून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या तरी भारतातील स्थिती अत्यंत धोकादायक अशी नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जायची गरज नाही. तसंच, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ओमायक्रॉन विषाणूचा फैलाव राज्यात होऊ नये यासाठी बाहेरीन देशातून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावर उतरल्यावर लगेचच क्वारंटाईन करणे या नियम बंधनकारक केला आहे. विमानतळावर उतरल्यावर नागरिकांची टेस्ट करण्यात येत आहे. त्यात कोणीही पॉझिटिव्ह असेल तर तो व्हेरियंट कोणता हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात टेस्ट लॅब आहेत. तेथे जेनेटिक सिक्वेन्सिंगचे नमूने तपासायला दिले आहेत. कस्तुरबासारखे लॅब अजून बनवण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. वाचाः तसंच, राज्यात बाहेरील देशातून आलेल्या नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते जेनेटिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत ते अहवाल यायला आणखी सात दिवसांचा अवधी लागेल. ते अहवाल आल्यानंतरच महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा रुग्ण आहे का हे सांगू शकतो. मात्र, महाराष्ट्रात ओमियक्रॉनचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परदेशात ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी मृत्यू झाल्याच्या घटना कमी आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींना ७ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. ७ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या तरी एवढी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही, असे WHO ने सांगितले असले तरीही ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतरच यासंबंधी निर्णय घ्यावा लागेल, असंही राजेश टोपे बोलले आहेत. राज्यात ८२ टक्के पहिला डोस नागरिकांना देण्यात आला आहे. तर, ४४ टक्के लसीकरण दुसऱ्या डोसचं झालं आहे. साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून उदिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xFBsBT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.