Type Here to Get Search Results !

ओमायक्रॉनचा धोका वाढणार? पालिकेने संसर्गाला रोखण्यासाठी मागितला ३० कोटींचा निधी

औरंगाबाद : ओमायक्रॉन या नवीन करोना विषाणुमुळे डिसेंबर ते मार्चदरम्यान होणारी संभाव्य रुग्ण संख्या व लागणारी औषधी यासाठी महापालिकेने तीस कोटींची मागणी सरकारकडे केली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. करोनाचा ओमायक्रॉन विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यासाठी व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रशासकांची बैठक घेतली. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर महापालिकेने तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. डिसेंबर ते मार्चदरम्यान अपेक्षित असलेली रुग्ण संख्या, औषधी, अन्नपुरवठा, उपचारासाठीचे पुरक साहित्य व उपकरणे, अँटिजेन चाचण्यांचे किट, आरटीपीसीआर चाचण्यांचे किट,कं त्राटी मनुष्यबळ, रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा पुरवठा, मोफत अंत्यविधी, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आदींसाठी तीस कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला आहे असा उल्लेख त्यांनी केला. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही तरतूद करण्यात यावी अशी विनंती करण्यात आल्याचे पांडेय म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Id0fSv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.