मुंबई: पक्षाच्या उमेदवार यांची विधानपरिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष , विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपचे आभार मानले. वाचा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना आज प्रमाणपत्र दिले. यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या सर्वांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवत महाराष्ट्रातील राजकीय परंपरा जपली गेली आहे. सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असताना भाजपने सातव यांच्यासाठी उमेदवारी मागे घेऊन जी राजकीय परिपक्वता दाखवली आहे त्याचे सत्ताधारी पक्षांकडून कौतुक होत आहे. वाचा: पटोले, थोरात यांनी केली होती विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून सातव यांच्याविरुद्ध संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी व परंपरा जपली जावी, असा काँग्रेसचा आग्रह होता. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याबाबत पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून तसेच केंद्रीय नेतृत्वाच्या अनुमतीने आज उमेदवारी मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संजय केणेकर यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर पुढील सोपस्कार होऊन सातव यांची बिनविरोध निवड आता जाहीर करण्यात आली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30RjDns