मुंबई: राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवणारे व सध्या एसटी कामगारासाठी आंदोलन करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार () यांच्यासाठी विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. 'पडळकर यांच्या जिवाला धोका आहे. त्यांना तातडीनं सुरक्षा द्यावी,' अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 'पडळकर हे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करत असतात. बहुजनांच्या हक्काचे लढे लढत असतात. त्यामुळं दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ले करताना दिसून येत आहेत. यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचाही सहभाग आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचा: 'लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही व लोकशाहीला ते अभिप्रेतही नाही. स्वपक्षीय असो की विरोधक, एखाद्याच्या जिवास धोका असेल तर त्याला सुरक्षा पुरवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पडळकर यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला असून त्यांना सुरक्षेची गरज आहे. राज्य सरकारनं त्याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा. अन्यथा, पडळकरांच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी घोंगडी बैठका घेत असताना पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर अलीकडंच सांगतील शिवसेनेचे कार्यकर्ते व पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही मागणी केली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FpebXx