Type Here to Get Search Results !

'अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही, अन्नदात्याची माफी मागा'

मुंबई: नवे कृषी कायदे () मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान (Narendra Modi) यांनी आज केल्यानंतर विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. 'केंद्र सरकारच्या भूमिकेमुळं शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्याची जबाबदारी सरकारला स्वीकारावीच लागेल. त्यामुळं सरकारनं अन्नदात्याची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते () यांनी केली आहे. कृषी कायदे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली. 'आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे. कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झालं आहे,' असं थोरात म्हणाले. वाचा: 'शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविलं गेलं. या अत्याचाराची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही. या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी बांधवांना आपला जीव गमवावा लागला, काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याचीही जबाबदारी मोदी सरकारला घ्यावी लागेल आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल,' असं थोरात यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही मोदी सरकारवर घणाघात केला आहे. 'देशात मनमानी चालणार नाही हेच शेतकऱ्यांच्या लढ्यातून समोर आलं आहे. यापुढं जनतेनं प्रत्येक चुकीच्या गोष्टींविरोधात उभं राहावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DwlHiU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.