मुंबई/दिल्ली: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो () या केंद्रीय संस्थेतील अधिकाऱ्यांच्या कथित खंडणीखोरीविरुद्ध गेल्या महिनाभरापासून आघाडी उघडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री () यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष () यांनी आज पाठराखण केली. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी आज राजधानी दिल्ली इथं पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मलिक यांनी एनसीबीमधील गैरप्रकारांविरुद्ध सुरू केलेल्या लढाईचं त्यांनी समर्थन केलं. 'अधिकारांचा गैरवापर होत असेल, तर तसं करणाऱ्यांना एक्सपोज करणं हे गरजेचं आहे. गैरप्रकार रोखणं गरजेचं आहे. ते काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर केंद्र सरकारनं तातडीनं कारवाई करायला हवी, असं शरद पवार म्हणाले. वाचा: भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक काल मुंबईत पार पडली. त्या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ठराव करण्यात आला. भाजपच्या या ठरावाची शरद पवारांनी खिल्ली उडवली. 'भाजपच्या राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हास्यास्पद आहे. सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं, तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाला, असा खोचक चिमटा त्यांनी काढला. 'अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत आहेत. मर्यादित कार्यकाळासाठी ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेनं पाहिलं आहे. सत्ता मिळत नसल्यानं नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,' असा टोलाही शरद पवार यांनी हाणला. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवाब मलिक यांची प्रशंसा केली होती. 'गुड गोइंग, मलिक' असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याचवेळी, पवारसाहेब हे देखील आपल्या पाठीशी असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. आज खुद्द पवारांनीच मलिक यांच्या लढाईचं कौतुक केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HxtxLl