Type Here to Get Search Results !

'मोदी हे हुकूमशहा नाहीत तर...'; भाजप नेत्याचं महत्त्वाचं विधान

अहमदनगर : ‘ घेत पंतप्रधान यांनी शेतकरी, शेतकरी नेते आणि विरोध पक्षाचा मान राखला आहे. मोदी हुकूमशहा आहेत, अशी जी प्रतिमा तयार करण्यात आली होती त्याला छेद देणारा हा निर्णय आहे,’ असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदाच होणार असल्याचे सांगून पिचड यांनी मोदींना धन्यवादही दिले आहेत. ( ) वाचा: पंतप्रधानांनी मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. त्याची कारणेही सांगितली जाऊ लागली आहेत. मुख्य म्हणजे स्वत: मोदी यांनीही कायदे मागे घेत असताना खेद व्यक्त केला आहे. त्यावरून त्यांनी नाइलाजाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. कोणी याचे श्रेय विरोधकांना तर कोणी आंदोलकांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नगर जिल्ह्यातील नेते पिचड यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. वाचा: पिचड म्हणाले, ‘पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा करून शेतकरी नेते, विरोधी पक्षाचा मान सन्मान राखला आहे. लोकशाहीमध्ये शेतकरी नेत्यांच्या व विरोधी पक्षाच्या म्हणण्यास महत्त्व देणारा हा निर्णय आहे. वेळप्रसंगी आपला आग्रह सोडून देण्याचे धैर्य मोदींनी दाखविले आहे. लोकशाही टिकविण्यासाठी विरोधी पक्षांच्या मताचा आदर केला जातो, हे मोदींनी दाखवून दिले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आता हे कायदे रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यांचे समाधानही होईल. तसेच हे हुकूमशहा नसून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे, हेही स्पष्ट होईल. काही लोकांनी मोदींची हुकूमशहा म्हणून जी प्रतिमा तयार केली आहे, त्यांना या निर्णयातून उत्तर मिळणार आहे. मोदी शेतकऱ्यांच्या बाजूचे असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत.' वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kSX88u

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.