Type Here to Get Search Results !

राहुल गांधी यांना 'त्या' खटल्यात हंगामी दिलासा; हायकोर्टाने दिले हे निर्देश

मुंबई: यांचा उल्लेख ' चौकीदार चोर है ' असा केल्याबद्दल काँग्रेस नेते व खासदार यांच्याविरुद्ध सदस्याने मानहानीची तक्रार केली असून याप्रकरणी मुंबईतील कोर्टाने राहुल यांना समन्स बजावले आहे. हा समन्स आणि या तक्रारीविरोधात राहुल यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असता त्यांना कोर्टाकडून आज हंगामी दिलासा मिळाला आहे. ( ) वाचा: राहुल गांधी यांच्याविरुद्ध मुंबईतील गिरगाव कोर्टात ही मानहानीची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत गिरगाव कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स काढून त्यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली असता त्यांना आज हंगामी दिलासा मिळाला. मानहानीच्या या खटल्यात २० डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश आज मुंबई हायकोर्टाने गिरगाव न्यायदंडाधिकारी कोर्टाला दिले. वाचा: कोर्टात काय घडलं? महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी केलेली मानहानीची तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदारांचे वकील रोहन महाडिक यांनी राहुल यांच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यावर राहुल यांचे वकील यांनी हरकत घेतली. न्यायदंडाधिकारी कोर्टात २५ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, असे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आलेले आहे. त्यामुळे अशी मुदत दिली जाणार असेल तर तोपर्यंत काहीतरी स्वरूपाचे संरक्षण राहुल यांना दिले जावे, असे त्यांनी नमूद केले. त्यावर आक्षेप घेण्यासाठी रोहन महाडिक उभे राहिले असता न्या. शिंदे यांनी त्यांना थांबवले. एकतर तुम्ही युक्तिवाद करा किंवा उत्तर दाखल करण्यासाठी वेळ घ्या. एकाचवेळी दोन्ही पर्याय तुम्हाला मिळू शकत नाहीत, असे शिंदे यांनी नमूद केले. त्यानंतर महाडिक यांना म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देत कोर्टाने तोपर्यंत राहुल यांच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्याचवेळी मानहानीच्या या खटल्यात २० डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही न्या. शिंदे यांनी गिरगाव न्यायदंडाधिकारी कोर्टाला दिले. वाचा: नेमकं काय आहे प्रकरण? राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एका सभेत पंतप्रधान यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख 'चौकीदार चोर है' असा केला होता. ही टीका म्हणजे मोदी यांच्याबरोबरच त्यांना मानणाऱ्या सर्व भारतीयांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा अवमान असल्याचा आरोप करत महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी ही मानहानीची तक्रार केलेली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oRN94h

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.