बीडः सरकारने घोषित केलेल्या पगार वाढीनंतर अनेक एसटी कामगार कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र, अजूनही काही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. पगारवाढीनंतर अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. तर, राज्यातील आगारांत पुन्हा बससेवा सुरु करण्यात आली आहे. बीडमध्ये मात्र बस सुरू झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली आहे. () बीडमध्ये दोन बस स्थानकाच्य बाहेर काढत असताना संपात सहभागी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा बीपी हाय झाल्याने यावेळी दोघांनाही चक्कर आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शीतल कांबळे असं महिला वाहकाचे नाव आहे तर बबन चव्हाण असं चक्कर आलेल्या चालकाचे नाव आहे. वाचाः गेल्या २३ दिवसांपासून एसटी कामगार हे संपावर आहेत. या २३ दिवसानंतर बीड विभागीय नियंत्रक मोरे यांनी दोन बस स्थानकामधून रवाना केल्या आहेत. त्यानंतर बीड आगारातील आंदोलनकर्त्या दोन कर्मचाऱ्यांचा बीपी हाय झाला असून चक्कर आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत केवळ दोन बस या बीड डेपोमधून रवाना झाल्या आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे बीडचं आंदोलन काय वळण घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाचाः दरम्यान, एसटी संपात सहभागी असलेल्या एकूण ४४४१ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १२२६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. पगारवाढीनंतर ११,५६९ कर्मचारी कामावर परतले आहेत. शुक्रवारपर्यंत राज्यात ३१५ बसगाड्या धावल्या. यात शिवशाही, शिवनेरी आणि साध्या गाड्या यांचा समावेश आहे. संपाआधी राज्यात रोज १२ हजार ५०० एसटी धावत होत्या. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CXqt7X