Type Here to Get Search Results !

शाहरुखची मॅनेजर चौकशी टाळतेय?; मुंबई पोलीस उचलणार मोठं पाऊल

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित खंडणी प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी अभिनेता याची मॅनेजर हिला समन्स बजावले आहे. मात्र, बुधवारीही ती जबाब नोंदवण्यासाठी आली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई पोलीस पुढचं पाऊल उचलतील अशी शक्यता आहे. ( ) वाचा: कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने शाहरुख खानचा मुलगा याला अटक केली होती. आर्यन हा सध्या जामिनावर सुटला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक पंच साक्षीदार याने या कारवाईबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हे डील १८ कोटीला फायनल करण्यात आले. त्यात किरण गोसावी, सॅम डिसूझा हे सामील होते. या रकमेतील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. डील फायनल झाल्यावर टोकन रक्कम म्हणून पूजा ददलानीने ५० लाख रुपये दिले होते, असा साईल याचा दावा आहे. तसे प्रतिज्ञापत्र त्याने दिले आहे. याच आरोपाच्या आधारे तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली असून एसआयटीने आतापर्यंत साईल, अन्य एक साक्षीदार विजय पगारे याच्यासह संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. एसआयटीने शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला याच प्रकरणात समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीचे कारण देत ती जबाब नोंदवण्यास हजर झाली नाही. ददलानीने काही अवधी मिळावा अशी विनंती एसआयटीकडे केली होती. त्यानुसार तो अवधी दिला गेला. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी फोनवरून संपर्क साधला मात्र पुन्हा एकदा तिच्याकडून तब्येतीचेच कारण देण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वाचा: दरम्यान, या प्रकरणात जो घटनाक्रम व पुरावे हाती आले आहेत ते पाहता पूजा ददलानी हिचा जबाब अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ददलानी हिचा जबाब नोंदवण्याचे कसोशीने प्रयत्न चालले आहेत. येत्या काही दिवसांत ददलानी एसआयटीसमोर हजर न राहिल्यास पुन्हा एकदा तिला समन्स पाठवला जाईल, असे सांगण्यात आले. खंडणीच्या प्रकरणात ज्याच्याकडे खंडणीची मागणी केली गेली त्याने तक्रार करणे आवश्यक असते. हे पाहता येत्या काळात शाहरुखची मॅनेजर समोर येऊन तक्रार दाखल करणार की नाही, यावरही बऱ्याच गोष्टी विसंबून आहेत. मुख्य म्हणजे एसआयटीकडून तपास सुरू असला तरी अद्याप याप्रकरणी गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, किरण गोसावी याच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. त्याचा जबाबही महत्त्वाचा असणार आहे. म्हणून त्याची कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी कायदेशीर बाबी पडताळत आहे. गोसावी याला पुण्यातील एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wxUl9c

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.