Type Here to Get Search Results !

'मान वर करायलाही वेळ मिळत नव्हता आणि...'; मुख्यमंत्र्यांचं जनतेला पत्र

मुंबई: मुख्यमंत्री हे मानेच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी आज रात्री रुग्णालयात दाखल होत आहेत. दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. त्यात प्रतिबंधक लसीकरणाबाबत त्यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ( ) वाचा: उद्धव ठाकरे यांना गेल्या काही काळापासून मानेच्या दुखण्याचा त्रास होत आहे. याबाबतच्या तपासण्या त्यांनी आधी केलेल्या आहेत. आता पुढील उपचार ते घेणार आहेत. त्यासाठी आज रुग्णालयात दाखल होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोविड काळात एक मोठं आव्हान सातत्याने सरकारपुढे राहिलं. या काळात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. एकीकडे कोविडशी मुकाबला करावा लागत असताना दुसरीकडे अर्थचक्र सतत चालू राहील यासाठीही पावले टाकावी लागत होती. या साऱ्या दगदगीचा उल्लेख करत यातून मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले आणि व्हायचा तो परिणाम झाला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. गिरगावमधील येथे मुख्यमंत्री ठाकरे मानेवरील उपचार घेतील असे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं... माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र! गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकासकामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो. आपला नम्र वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3H6CefB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.