Type Here to Get Search Results !

करोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार; राज्यासमोर आता 'हे' संकट!

मुंबईः करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळं लस घेण्यास नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभं राहिल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठीही मनस्ताप सहन करावा लागत आहे. () करोनाच्या तिसऱ्या लाटेवर हाच एक पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र, लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावला असल्यानं आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यासाठीही नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. ठाण्यातील ६५ वर्षीय मंगरू कनोजिया यांना करोनावरील लसीच्या दुसरा डोस निर्धारित वेळेच्या २२ दिवसांनंतर मिळाला. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी बोलावलं होतं. मात्र, २८ दिवसांनंतर लसीकरणासाठी गेल्यावर केद्रावर लससाठी उपलब्ध नव्हता. दुसऱ्या केंद्रावरही तीच परिस्थीती होती. त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर एका केंद्रात लससाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. तेव्हा सकाळी ९ वाजता केंद्रावर रांगेत उभे होतो. मात्र, आमचा नंबर यायच्याआधीच लस संपलेली होती. त्यानंतर अनेक लसीकरण केंद्रावर फेऱ्या मारल्यावर २२ दिवसांनंतर दुसरा डोस मिळाला, असं ठाण्याचे मंगरू कनोजिया यांनी म्हटलं आहे. वाचाः २ डोसमधील अंतर वाढल्यानं नागरिकांना चिंता करण्याची गरज नाहीये. दोन डोसमधली अंतर वाढल्यानं अँटीबॉडीज बनतात. अन्य रोगांचा संसर्ग होऊ नये म्हणून लसीचा एक डोस दिला जातो. एक डोसनंही अँटीबॉडी बनतात. त्यामुळं करोना लसीचा दुसरा डोस उशीरा मिळाला तरी घाबरण्याची गरज नाहीये, असं डॉ. ईश्वर गिलाडा यांनी म्हटलं आहे. तसंच, करोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी शरीरातील अँटीबॉडी विकासित होण्यासाठी व अधिक वेळेपर्यंत टिकून राहावा यासाठी दुसरा डोस दिला जात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचाः दरम्यान, राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये करोना साथरोगाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यानुसार आरोग्य यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xuH3Jn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.