Type Here to Get Search Results !

'सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले त्यामागे काही विशेष संदेश आहे का?'

मुंबईः 'धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे, सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले. त्यामागे काही विशेष संदेश आहे का?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तसंच, सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हे पटेल काय,' असाही प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच असल्याचं विधान सरसंघचालक मोहम भागवत यांनी केलं होतं. सरसंघचालक यांच्या या विधानाची देशभरात चर्चा आहे. शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून सरसंघचालक यांच्याविधानावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या डीएनएची आठवण करुन द्यावी लागली, असं काय घडलं?, अशी विचारणा शिवसेनेनं केली आहे. 'गेल्या पाच-सहा वर्षांत देशाचे वातावरण अतिफाजील, उन्मादी लोकांच्या हाती गेले. निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिला. पण हा 'उन्माद' प. बंगालात अजिबात चालला नाही. किंबहुना केरळातही स्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारलं नाही. उत्तर प्रदेशात वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे. हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय?,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः 'गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱ्यांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचाः 'मुसलमान हे बाबरचे किंवा चंगेज खानचे वंशज नाहीत. त्यांचा डीएनए इथलाच आहे, असं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगत होते, अशी आठवण शिवसेनेनं करुन दिली आहे. मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत असे सरसंघचालक यांनी गर्वाने सांगितले. फक्त त्यांनी स्वतःला हिंदुस्थानी मानावे असे भागवत यांचे मागणे आहे. हिंदू हा सहिष्णू, तितकाच विनम्र आहे. त्याने आक्रमणकारी मोगलांचा प्रतिकारही सहनशीलतेनेच केला. मोगल आक्रमक होते म्हणून हिंदूंनी त्यावर तलवार चालवली. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे राष्ट्रीयत्वच होते. भागवत यांनी त्याचाच पुरस्कार केला आहे,' असं मत शिवसेनेनं मांडलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hoKxbX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.