Type Here to Get Search Results !

साखर कारखान्यांची 'ईडी' चौकशी: रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

नगर: ‘ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत साखर कारखान्यांची ‘’ मार्फत चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला. तसे पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पाठविण्यात आले आणि चौकशीही सुरू झाली. हा सर्व सत्तेसाठी चालविलेला आटापिटा आहे', असा आरोप करताना राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना मराठा व प्रश्न सोडवण्यासाठी पत्र लिहिले असते तर ते जास्त योग्य झाले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार यांनी भाजपवर निशाणा साधला. (Rohit Pawar On Sugar Mills Update ) वाचा: रोहित पवार आज कर्जत तालुक्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘ईडी’चे हत्यार बनविले आहे. हे कृत्य घटनाबाह्य आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांची चौकशी करा, आमची तयारी आहे. परंतु, ती पारदर्शक पद्धतीने व्हावी. कुठलाही आकस ठेवून अशा पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करणे अतिशय दुर्दैवी आहे. यामुळे चुकीचा पायंडा आणि प्रथा यापुढे भविष्यात पडतील. कारखान्यांच्या चौकशीसोबतच आरक्षणाच्या प्रश्नावरही अशीच तत्परता या नेत्यांनी दाखविली असती तर अधिक बरे झाले असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने केवळ सत्ता द्या, मग प्रश्न सोडवू, असे म्हणणे हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. गुजरात मधील पूरग्रस्तांसाठी शंभर कोटींची मदत पंतप्रधान तत्काळ देतात. मात्र, महाराष्ट्राचे थकीत २८ हजार कोटी रुपये देण्यास तयार नाहीत. महाराष्ट्रानेही भाजपाचे खासदार निवडून दिले आहेत. याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. महाराष्ट्रातील लोक हे या देशातले नाहीत का?’ असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. वाचा: ‘एमपीएससी’ परीक्षा तातडीने घ्यावी ‘एमपीएससी’ परीक्षेच्या कारणातून पुणे येथील विद्यार्थी याने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पवार यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, ‘राज्य सरकारने वेळ न घालवता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे आयोजन करावे. रखडलेली नोकर भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. करोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याने युवा पिढीमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सततच्या अभ्यासामुळे युवकांच्या मनावर ताण निर्माण झालेला असतो. अशा परिस्थितीतून काही युवक वेगळा विचार करतात. मात्र, त्यांनी असे करू नये. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याची झळ आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बसू शकते याचा विचार युवकांनी करण्याची गरज आहे,’ असेही पवार म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wglRGD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.