राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला असला तरी ज्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नव्या नियमांबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर धोका टळलेला नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये १५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, यावेळी काही निर्बंध शिथिल करण्यात आले असून पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहून पुढच्या १५ जूनपर्यंतची नियमावली आखली जाईल, असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे.
राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला असला तरी ज्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नव्या नियमांबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
काही ठिकाणी निर्बंध शिथील करणार
ब्रेक द चेन अतंर्गंत लागू केलेल्या नव्या निर्बंधांची घोषणा केल्यानंतर या कालावधीत काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर, २० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यात निर्बंध वाढवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता यासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे.
दुकानांची वेळ वाढवली?
पॉझिटिव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
सलून, स्पा, जिमबाबत काय निर्णय?
दुकानांना वेळ वाढवून दिल्यानंतर जिम, स्पा आणि सलून बाबतही निर्णय होणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, सलून, स्पा व जिम आणि इतर सेवांबाबत अद्याप कोणत्याही निर्णय घेण्यात आला नसून १२ मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार या सेवा बंद राहणार आहेत.
आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी?
पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
विद्यार्थ्यांना प्रवासमुभा?
परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी फक्त परीक्षार्थी विद्यार्थीच प्रवास करु शकतो. पालकांना त्याच्यासोबत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आंतरजिल्हा प्रवासासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व हॉल तिकिट जवळ बाळगणे बंधनकारक आहे, असे आदेशात नमुद केलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2R5D8nk