Type Here to Get Search Results !

अशोक चव्हाण निष्क्रिय आणि नाकर्ते; सदाभाऊ खोत यांचा जोरदार हल्लाबोल

कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'अशोक चव्हाण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्रिपदावरुन कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, ते मराठा समाजातील प्रस्थापितांचे सरदार आहेत, निष्क्रिय, नाकर्ते आहेत, त्यांची लायकी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची आहे. त्यांच्याकडून तातडीने उपसमितीचे अध्यक्षपद काढून घ्या,' असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ‘राज्यात प्रस्थापित आणि विस्थापित असे मराठा समाजात दोन गट आहेत. यातील प्रस्थापित राजकारण्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. अनेक वर्षे राज्यात प्रस्थापित मराठा नेत्यांची सत्ता आहे, त्यांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. उलट सारथी संस्था कोणी बंद पाडली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्य नियोजन मंडळात विलीन करण्याचे कारण काय?' असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. 'ते सारे चोरांच्या आळंदीला जाणारी नेते आहेत...'; नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत? 'मराठा आरक्षणसंबंधी महाविकास आघाडी सरकार पहिल्यापासून बेफिकीर आहे. वास्तविक सरकारने वकिलांची फौज नेमून कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती. पण तसे झाले नाही. उलट मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल आरक्षण देणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. तरीही ते राज्यपालांना भेटतात. त्यांना देवाच्या आळंदीला जायचेच नाही, ते सारे चोरांच्या आळंदीला जाणारी नेते आहेत. अनेक जण मराठा समाजाचे नाव घेऊन सरदारकी भोगत आहेत, हे सरदारच मराठा आरक्षणातील अडसर आहेत. त्यांना पायउतार करावेच लागेल. जोपर्यंत ते पायउतार होणार नाहीत, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणे कठीण आहे,' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खोत यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, चव्हाण यांना आदर्श कारभारामुळे घरी जावे लागले होते . दोन वर्षे ते मराठा आरक्षणाचे ज्या पद्धतीने काम करत होते ते काम पाहता अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का अशी शंका येते. त्यांना आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ते ज्या पद्धतीने टीका करत आहेत, ते पाहता काम न करणाऱ्या या निष्क्रिय नेत्याला आता उपसमितीचे अध्यक्ष पद देणे चुकीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून ते तातडीने काढून घ्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QqFwVy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.