Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ऋतुराज देशमुखांनी गाव करोनामुक्त कसं केलं?

सोलापूरः राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री यांनी या योजनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील तीन गावांचा उल्लेख करत गावच्या सरपंचांच्या कामाचं कौतुक केलं आहे. पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. यातील या सर्वात तरुण सरपंच असून सध्या राज्यभरात त्याची चर्चा आहे. ऋतुराज यांनी गाव करोनामुक्त कसं केलं याचा घेतलेला आढावा. उद्धव ठाकरे काय म्हणाले? करोनाची रुग्णसंख्या ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे ‘करोनामुक्त गाव’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण करोना मुक्त गाव आणि करोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी हिवरेबाजारचे पोपटराव पवार, घाटणे (ता. मोहोळ) येथील ऋतुराज देशमुख, अंतुर्ली (द. सोलापूर) येथील कोमल कर्पे यांनी आपली गावे करोनामुक्त केली आहेत, असं म्हणत त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. व त्यांच्याशी चर्चा करून राज्यात करोनामुक्त गाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. कोण आहे ऋतुराज देशमुख? सोलापूरच्या मोहोल तालुक्यातील घाटणे गावचे ऋतुराज देशमुख सरपंच आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षी ऋतुराज देशमुख यांनी सरपंच पदाची निवडणुक लढवली होती व त्यांचा विजयही झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी स्वतःचं पॅनल उभं केलं होतं. त्यांच्या पॅनलचाही मोठा विजय झाला होता. निवडणुकीचा जाहीरनामा ऋतुराज देशमुख यांनी निवडणुकीसाठी तयार केलेल्या वचननामा चर्चेचा विषय ठरला होता. गावच्या विकासाचा तयार केलेला जाहीरनाम्यामुळं सोशल मीडियावर त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. निवडून आल्यानंतर गावात काय उपाययोजना करणार याची माहितीच त्यांनी जाहीरनाम्यात दिली होती. गाव करोनामुक्त कसं केलं? सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ऋतुराज यांनी गावाच्या विकासासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात करोनाने प्रवेश केला. मार्चपर्यंत घाटणेमध्ये एकही बाधित नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात रुग्णांची संख्या वाढू लागली. गावाला करोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि सुरू झाली एक आगळीवेगळी मोहीम. करोनामुक्तीचा पॅटर्न काय? - गावात घरोघरी जाऊन आशा सेविकांच्या मदतीने दर आठवड्याला तपासणी मोहीम राबविली. - नागरिकांची ऑक्‍सिजनची पातळी, तापमान तपासले. प्रत्येक कुटुंबाला 'करोना सेफ्टी किट' दिले. त्यामध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश होता. - बाहेरगावातून येणाऱ्या प्रत्येकाला सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करण्यात येत होते. - गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. करोनाकाळात ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांची मानसिकता ढासळू न देता ग्रामपंचायत आणि प्रशासन त्यांच्यासोबत असल्याचे जाणीव करून दिली. त्याचेच हे यश आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p7wBoY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.