अमरावती : मोबाईल हा सध्या प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. अशातच अमरावती शहरातील मुख्य चौकात जळगाव येथील तीन इसम बनावट बिलाच्या आधारे महागडा मोबाईलची बेभाव विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शहरातील तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून १७ मोबाईल असा एकूण २ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेला काही इसम खोटे बिल देऊन मोबाईलची विक्री करीत असून सध्या ते सरोज चौकातील भारत लॉजमध्ये थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने धाड टाकून जळगाव जिल्ह्यातील खामखेडा मुक्ताईनगर येथील तिन्ही चोरटे राहुल श्यामलाल पवार, २३, भीमा नरसिंग पवार, २८, सुरेश रामलाल पवार, ४० यांना अटक केली. त्यांच्याकडे ओपो कंपनीचे १७ मोबाईल आढळले ते जप्त करून तसेच तिन्ही चोरट्यांना कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ .आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेश राठोड, नपोकाँ गजानन ढेवले, नीलेश जुनघरे, चेतन कराडे यांनी केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GcmqXa