Type Here to Get Search Results !

धाकधुक वाढली! दुबईतून आलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण

उस्मानाबादः भारतात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला असून महाराष्ट्रात व्हेरियंटचे १७ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. विदेशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. शुक्रवारी उस्मानाबाद जिल्हयातील बावी येथे ओमिक्रॉन संशयित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दुबईतील शारजा येथून भारतात आल्यानंतर त्या प्रवाशाची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली असून प्रशासनाने स्वॅब नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. वाचाः हा प्रवाशी करोना पॉझिटिव्ह असला तरी तो ओमिक्रॉनचा रुग्ण आहे का? यासाठी जिनॉमिंग सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात याचा रिपोर्ट येईल अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान बावी गावात संशयित रुग्णापासून फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गावातील परिसर सील करण्यात आला. वाचाः शनिवारी बावी गावच्या सीमा प्रशासनाने बंद केल्या असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी हे आदेश काढले आहेत शारजा येथुन आलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले २ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी त्या रुग्णाच्या संपर्कातील १३ व २० वर्षीय दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झाले असुन बावी गावापासुन ३ किमी अंतर रेड झोन तर ७ किमी अंतर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dLrLZE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.