Type Here to Get Search Results !

'अशा वेळी सुद्धा आमचा विरोधी पक्ष राज्याची बाजू घेत नाही, हे दुर्दैव'

विजयसिंह होलम । अहमदनगर राज्यात गेल्या काही काळात आलेल्या नैसर्गिक अपत्तीच्या काळात केंद्र सकारकडून अपेक्षित मदत आली नसल्याची टीका राज्यातील सत्ताधारी मंडळीकडून केली जाते. राष्ट्रवादीचे आमदार (Rohit Pawar) यांनीही यासंबंधी अनेकदा टीका केली आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने मदतीसंबंधीची माहिती दिली आहे. त्यातील विसंगती दाखवून देत आमदार पवार यांनी केंद्र सरकारलाच प्रश्न विचारला आहे. सोबत राज्यातील विरोधी पक्ष भाजपलाही त्यांनी जबाबदार धरले आहे. 'काही आपत्तींमध्ये राज्य सरकारांकडील पैसा पुरेसा नसतो, अशा वेळेस पाहणी पथकांच्या रिपोर्टची वाट न बघता केंद्र सरकार राज्यांना आगाऊ आर्थिक मदत देते', असं आपत्ती व्यवस्थापन संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी अभिमानाने लोकसभेत सांगितलं. मदत देण्यात आलेल्या या राज्यांमध्ये गुजरात, ओरीसा, पश्चिम बंगाल, झारखंड ही राज्ये आहेत. पण त्यात महाराष्ट्र नाही. ज्या तौक्ते वादळासाठी ही मदत दिली गेली, त्या वादळाने तर महाराष्ट्रातही नुकसान केलंच होतं, पण तरीही महाराष्ट्राला मदत मिळाली नाही, असं का?,' असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. वाचा: 'निवडणुका असलेल्या किंवा सरकार असलेल्या राज्यांनाच मदत द्यावी, अशी तर शिफारस वित्त आयोगाने केली नाही ना? राज्याला आगाऊ मदत तर मिळत नाहीच पण रीतसर प्रस्ताव पाठवूनही मदत मिळत नाही, हे दुर्दैव आहे. अशा वेळीही आमचा विरोधी पक्ष राज्याची बाजू घेत नाही, हे त्याहून मोठं दुर्दैव,’ असेही पवार यांनी म्हटले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rSfV81

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.