Type Here to Get Search Results !

सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पेटवणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे कापूस तसेच सोयाबिन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परीस्थितीत केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य पुरविण्याच्या नावाखाली सोया पेंडची आयात केली. यामुळे सोयाबिनचे भाव कोसळले असून केंद्र सरकारने कोंबड्या जगविण्याचा अनं शेतकरी मारायचा धंदा बंद करावा अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. विशेष म्हणजे आता न्याय मागण्यांसाठी सोयाबिन, कापूस उत्पादक शेतक-यांचे आंदोलन पेटविणार असल्याचा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते. विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतक-यांचा कुणीही वाली राहिलेला नाही. ज्या पध्दतीने उस उत्पादक शेतकरी तसेच त्या भागातील लोकप्रतिनिधी आपली बाजु मांडून न्याय पदरात पाडून घेतात त्याच पध्दतीने आता सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करुन त्यांच्यासाठी लढा उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकताच बुलढाणा येथे मोर्चा काढून या कार्यास प्रारंभ केला. आता यवतमाळ, अमरावती, अकोला, आकोट, परभणी, हिंगोली, नांदेड याठिकाणी बैठक घेऊन मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे. वाशिम येथे या मोहिमेचा समारोप होणार असून याच दिवशी दिनांक १२ नोव्हेंबरपासून सुरु होणा-या आंदोलनाची रुपरेशा घोषीत केली जाणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. शेतक-यांच्या मुलांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागे राहून जिंदाबाद, मुर्दाबाद च्या घोषणा देण्यापेक्षा आपल्या शेतकरी बापाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. सध्या सोयाबिन ला एकरी २५ हजार रुपये खर्च येत आहे. दुसरीकडे सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल चे उत्पन्न होत असल्याने पाच ते दहा हजार रुपयांचे शेतक-यांचे एकरी नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकविमा कंपण्यांनी तसेच सरकारने तातडीने शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात ४५ लाख हेक्टर वर सोयाबिनचा पेरा होत असतो. १२ लाख हेक्टर वर उसाचा पेरा होतो. असे असतांनाही सोयाबिन शेतकरी सतत नुकसान सहन करीत असल्याने सरकार विरोधात आता जनआंदोलन पेटविणार असल्याचे तुपकर यांनी सांगीतले. केंद्र सरकारने १२ लाख मेट्रीक टन सोया पेंड आयात केले. पामतेल तसेच सोया तेलावरील आयात शुक्ल शुन्य करुन टाकले. तेलावर स्टॉक लिमीट लावण्यात आल्याने व्यापा-यांच्या खरेदीला लिमीट लागली आहे. आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीवर मात्र लिमीट न लावल्याने अंबाणी तसेच अदाणी सारख्यांना रान मोकळे झाले आहे. या धनाढ्य व्यावसाईकांना लाभ मिळवून देण्यासाठीच सोयाबिनच्या किंमती पाडण्याचे षडयंत्र रचल्या गेल्याने सोयाबिन शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगीतले. सध्या सोयाबिनचे भाव चार हजारावर आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे राहीलेल्या ४ लाख सोया पेंड ची आयात थांबवा अन्यथा शेतक-यांच्या रोशाला बळी पडाल असा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन सह कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अजुनही मदत मिळालेली नाही. लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, अशी परीस्थिती आहे. विदर्भातील लोकप्रतिनिधी शेतक-यांना वा-यावर सोडून दुबईचे दौरे करीत आहे. पिकविमा कंपण्यांसोबत हातमिळवणी करुन मलीदा खाल्ला जात आहे. पिकविमा कंपण्यांनी यावर्षी ५ हजार ८०० कोटी रुपये जमा करुन फक्त ८०० कोटीची नुकसान भरपाई दिली. विदर्भातील पाच जिल्हयातील ८०० शेतक-यांनी गेल्या नऊ महिण्यात आत्महत्या केल्या. त्यामुळे आता आम्ही स्वस्थ बसनार नाही. सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतक-यांची मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगीतले. पत्रकार परीषदेला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष जाधव, संतोष अरसड, विष्णु लांडगे उपस्थित होते. अन्यथा विज कार्यालय पेटवू... अडचणीत असलेल्या शेतक-यांना कैचीत पकडून त्यांच्या शेतातील मोटरची विज कापण्याचा धंदा विज वितरण कंपणीने सुरु केला आहे. मोठमोठ्या कंपण्यांकडील विज बिल वसुली न करता शेतक-यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास विज वितरण कंपणीचे मुख्य कार्यालय पेटविल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. विजमंत्र्यांनी त्यांच्या अधिका-यांना आवरायला हवे अन्यथा अदाणी, अंबाणीच्या विमानात फिरणा-यांचा हिशोब आम्हाला करावा लागेल असा इशारा सुध्दा रविकांत तुपकर यांनी दिला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D65eSo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.