Type Here to Get Search Results !

फडणवीसांनी 'हे' स्वतः मान्य केलं आहे; यशोमती ठाकूर यांनी साधला निशाणा

अमरावती: त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते यांनी आज रविवारी अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर व पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली आहे. १२ च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अपूर्ण व अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. वाचाः देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर यशोमती ठाकूर यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे. १२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे,' असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली. याद्वारे देशभरात समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात. हे नियोजीत मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले यांची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची यापाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30IYZGa

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.