Type Here to Get Search Results !

एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

मुंबई: राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेला संप (MSRTC Workers Strike) १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Sharad Pawar) यांनी आज अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. निफाड दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यावेळी एसटी कामगारांच्या संपाबाबत व मागण्यांबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं. 'परिवहन मंत्र्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांचे सात प्रश्न होते. त्यातील मुख्य प्रश्न महागाई भत्ता हा होता. त्यातील विलिनीकरण ही मागणी सोडली तर सगळ्या मागण्यांवर एकवाक्यता झाली आहे. मात्र, विलिनीकरणाचा मागणी मान्य झालेली नाही. विलिनीकरणाची मागणी करणं ह्याचा अर्थ मालक बदलण्याची मागणी करणं असा आहे. एखाद्या संस्थेकडं आपण नोकरी मिळवायची आणि काही दिवसांनी माझी नोकरी दुसऱ्या मालकाकडं वर्ग करा असं म्हणायचं. असं कधी नोकरीमध्ये करता येतं का?,' असा प्रश्न पवार यांनी केला. 'कामगारांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवलेच पाहिजेत, पण जिथं तुम्ही नियुक्त झाला तिथून दुसरीकडं वर्ग करा, हे म्हणणं पूर्ण करण्यासारखं आहे असं मला प्रथमदर्शनी दिसत नाही,' असं पवार म्हणाले. वाचा: 'एसटीच्या संपाला उच्च न्यायालयानंही मनाई केली आहे. त्यावर सुनावणीही सुरू आहे. असं असताना संघटनांनी संपावर ठाम राहणं हे कामगारांचं नुकसान करण्यास मदत करण्यासारखं आहे. एसटीच्या संघटना व सरकारमधील प्रतिनिधींनी एकत्र बसून यावर मार्ग काढायला हवा. नागरिकांच्या यातना वाढल्या आहेत. कार्तिकी एकादशीला शेकडो लोक जाताहेत. त्यांना त्रास होतोय,' याकडंही शरद पवार यांनी लक्ष वेधलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3osQS8u

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.