यवतमाळ: पिकाला पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या आजी, आजोबा व नातवाला शेतात टाकलेल्या विद्युत तारेचा धक्का बसल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील (शेंद्री) येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ( ) वाचा: (७०), (६५), नातू (१७) अशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यासंदर्भात डोल्हारी येथील पोलीस पाटलांनी घटनेची प्राथमिक माहिती दारव्हा पोलीस व महसूल प्रशासनाला दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवाशीच एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. वाचा: नेमकं काय घडलं? मारोती सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावरच शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी या हंगामात हरभऱ्याची पेरणी केली आहे. या पिकाला पाणी देण्यासाठी आज सकाळी ते शेतात गेले होते. त्यांच्यासह पत्नी मणकर्णा व नातू सुमित हेसुद्धा होते. दरम्यान, पंप सुरू करण्यासाठी मारोती हे गेले असता तिथे असलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी मनकर्णा यांनी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. आजी-आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हासुद्धा धावत गेला. आजी-आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही विजेचा धक्का लागला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qbzYhc