Type Here to Get Search Results !

क्रिकेटचा ग्रामविकासाशी संबंध कसा? पोपटराव पवारांनी उलगडले रहस्य

अहमदनगर: उत्तम क्रिकेट खेळाडू असलेले () तरुण वयातच क्रिकेट सोडून ग्रामविकासाच्या क्षेत्रात वळाले आणि () या गावाचा कायापालट करून आदर्शगाव साकारले. एवढेच नव्हे तर यासंबंधीच्या राज्य सरकारच्या समितीचे कार्याध्यक्ष या नात्याने अनेक गावांना यासाठी प्रोत्साहन दिले. जलसंधारणाच्या कामाबद्दल त्यांना 'पद्मश्री' सन्मान मिळाला आहे. याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. या यशाचे श्रेय त्यांनी गावकरी आणि क्रिकेटला दिले. क्रिकेटमधूनच या कामाची प्रेरणा मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'पद्मश्री' स्वीकारल्यानंतर बुधवारी पवार यांचे जिल्ह्यात आगमन झाले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी हिवरे बाजारमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आणि गाव जेवणही आयोजित करण्यात आले होते. देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत गावकऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. वाचा: यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेटने मला सहनशीलता शिकवली. त्याचाच उपयोग हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडला. गावात काम करण्यासाठी सहनशीलता आणि टीम वर्कला मोठे महत्त्व असते. हेच कौशल्य क्रिकेटमधून मिळाले आहे. दुसरी एक गोष्ट कटाक्षाने पाळली, ती म्हणजे राजकारणापासून दूर राहिलो. निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांकडून ऑफर येत होत्या. पण राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर देण्याचे ठरविले. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले. गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. येत्या काही वर्षांत राज्यातील पाचशे गावे हिवरे बाजार, राळेगणसिद्धीप्रमाणे आदर्श होणार आहेत. पाण्याचा ताळेबंद केल्यानेच हिवरेबाजारने दुष्काळावर मात केली. आता गावाच्या मालकीची शेततळी करून समन्यायी पद्धतीने पाणी वाटपाचे धोरण स्वीकारावे लागणार आहे,’ असेही पवार यांनी सांगितले. वाचा: यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार निलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे, अशोकराव खरात, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, माधवराव लामखडे, काशिनाथ दाते, सरपंच विमल ठाणगे उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n07vZv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.