Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा; मतदान केंद्राबाहेर तणाव

साताराः सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र, या मतदानादरम्यान तणाव पाहायला मिळाला. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे. तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे. तसंच, पोलीसांचा फौज फाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे. मतमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. जावली मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे गेले दहा वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक म्हणून निवडून गेले. मात्र, आता सामान्य घरातील व्यक्ती हा उमेदवार म्हणून देण्यात यावा अशी मागणी वसंतराव माणकुमरे यांच्या राष्ट्रवादीच्याच एका गटाने केल्यामुळे शशिकांत शिंदे आणि रांजणे यांच्यामध्ये हा संघर्ष पहायला मिळत आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आलं. आज मतदानाच्या निमित्तान पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे याठिकाणी दोघांमध्ये वाद होउन तणाव निर्माण झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज मतदान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या मध्ये एकुण १० जागांसाठी मतदान झालं. या अगोदर ११ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील तसंच रामराजे नाईक निंबाळकर हे काही प्रमुख नेते बिनविरोध निवडुन आले होते. मात्र नाराजांच्या बंडाळीमुळे या निवडणुकीत रंगत वाढली होती. माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांना विरोधाचा सामना करावा लागला. तर सहकार मंत्र्यानाच थेट आव्हान दिलं ते उदयसिंह उंडाळकर यांनी थेट सहकार मंत्र्यानाच आव्हान दिल्यामुळं सहकार मंत्र्यांना जीवाच रान करुन रणनिती आखावी लागली. तर राज्यगृहमंत्री शंभुराज देसाई यांना त्यांचेच विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांच आव्हान मिळाल्यामुळं शंभुराज देसाईंना या ठिकाणी अस्तित्वाची लढाई करण्यासाठी धडपड करावी लागतीये. एकुण १९६४ मतदार याठिकाणी मतदान करणार असून या निवडणुकीमध्ये आता नक्की कोण विजयी होणार, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CCjtx7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.