Type Here to Get Search Results !

चंद्रकांत पाटलांच्या टीकेचा अशोक चव्हाणांकडून खरपूस शब्दांत समाचार

: राज्यात मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी नुकतीच आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारने रखडवले असल्याची टीका केली होती. या टीकेनंतर आता काँग्रेस नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. () ' यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,' असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. '५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही आणि हा विषय राज्याच्या अखत्यारीतला नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. मात्र असं असताना चंद्रकात पाटलांनी राज्य सरकारने आरक्षण रखडवल्याचा शोध कुठून लावला,' असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलारांनाही दिलं प्रत्युत्तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर टीका करताना हे सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे लाड पुरवणारे सरकार असल्याची टीका केली. त्याबाबत उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, 'कोण कुणाचा पुत्र, कुणाची पुत्री यात मला पडायचं नाही. मला राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलणं योग्य वाटतं.'


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FToQdo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.