अहमदनगर : ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा () याच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीला मोठा धक्का बसला असून न्यायालयाच्या टिपण्णीनंतर आता राज्याचे गृहमंत्री यांनी मोठं विधान केलं आहे. ‘न्यायालयाच्या या मतावरून आर्यन खान निर्दोष असल्याचंही म्हटलं जाऊ शकतं. असं असेल तर मग एनसीबीने त्याच्यासंबंधी चुकीची भूमिका घेतली का? याचीही चौकशी केली जाईल,’ असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील कार्यक्रमासाठी वळसे पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना आर्यन खान प्रकरणासंबंधी विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली. 'केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर' वळसे पाटील म्हणाले की, 'मी आतापर्यंत यासंबंधीचा उच्च न्यायालयाचा निकाल पूर्ण वाचलेला नाही. मात्र, जर त्यात मत व्यक्त करताना न्यायालयाने पुरावे नसल्याचं म्हटलं असेल तर आर्यन खान हा निर्दोष आहे असंच म्हणावे लागेल. असं असूनही मग एनसीबीने त्याच्या बाबतीत घेतलेली भूमिका चुकीची असेल तर त्यासंबंधीही चौकशी केली जाईल,’ असं सांगून केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा सातत्याने चुकीचा वापर करत केला जात असल्याचा आरोपही वळसे पाटील यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी राज्य सरकारकडून वेगळी चौकशी सुरू झाल्यास पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FBKAtW